प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’

त्तावीस मे हा पंडित नेहरूंचा स्मृतिदिन! यंदा त्यांची विशेष आठवण येण्याचं एक कारण आहे. ते म्हणजे आज देशात करोनाचं विनाशाकारी, हजारो माणसांचा दररोज बळी घेणारं तांडव सुरू आहे. अशा प्रसंगी सर्वांत मोठी उणीव भासते आहे, ती मानवतेची साद घालणाऱ्या व निराश मानसिकतेमध्ये जगण्याची उमेद पेरणाऱ्या राष्ट्रनेत्याची.

काहीशी देशाची अशीच अवस्था १९४७मध्ये होती. फाळणी पश्चात स्वतंत्र झालेला भारत. दंगे, खूनखराबा व लाखोंचं स्थलांतर… माणुसकी जणू मृत झाली आहे की, काय असं वाटावं अशी सार्वत्रिक स्थिती होती. पण देशाच्या त्या अत्यंत नाजूक, तणावाच्या, द्वेष आणि हिंसेच्या काळात एक राष्ट्रनेता होता, ज्यानं देशाला नवी उमेद दिली. माणुसकी जागवली आणि संकटातून – आपत्तीतून देशाला सावरलं, प्रगतीपथावर नेलं. नवा आधुनिक भारत घडवला. त्या राष्ट्रनेत्याचं नाव होतं – पंडित जवाहरलाल नेहरू.

नेहरूंचं आज मी स्मरण करणार आहे उर्दू काव्यातून. जे मुस्लिम मानस देशाच्या फाळणीला आणि दंग्या-धोप्यासाठी नेहरूंना जबाबदार धरत होते, त्याच मुस्लिम समाजाचे कवि-कलावंत नेहरूंना मानवतेचे पुजारी, समाजवाद आणि सेक्युलॅरिझमचे रखवाले आणि आधुनिक भारताचे शिल्पकार मानत होते! हे सारे प्रमुख नावाजलेले उर्दू शायर हे प्रामुख्याने ‘प्रगतिशील लेखक संघ’(प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंट) आणि ‘इप्टा’(भारतीय जन नाट्य मंच)शी संबंधित होते. ते एक तर कार्डहोल्डर पक्के मार्क्सवादी कम्युनिस्ट होते किंवा त्यांचे वैचारिक सहप्रवासी होते.

असे उर्दू शायर (जे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण संगीतयुगाचे बिनीचे लोकप्रिय गीतकारही होते.) नेहरूंच्या समाजवादी विचारांचा, सेक्युलर आचरणांचा आणि आधुनिक विज्ञाननिष्ठेचा काव्यातून प्रसार करत होते. त्यातून सामान्य भारतीयांना वाटणाऱ्या आशा-आकांक्षा प्रगट करत होते. नेहरूंकडून समताधिष्ठित समाजाची अपेक्षा करत होते.

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

वाचा : डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन

१९६४ साली नेहरूंचं हृदयविकारानं निधन झालं, तेव्हा अर्धा डझन शायरांनी शोकगीतं लिहिली. तो केवळ भावनाविवशतेचा आविष्कार नव्हता, तर तो नेहरूंचं मोठेपण, कर्तृत्व आणि त्याहीपेक्षा भारत नामक संकल्पनेचा, जी समाजवादी, सेक्युलर, सर्वसमावेशक व आधुनिक विज्ञाननिष्ठ होती, त्या साऱ्यांचा सार्थ आणि समर्थ अशा उद्घोषकाचा व कृतिशील नेतृत्वाचा तो उत्स्फूर्त शायराना आविेकार होता!

आज पन्नास-पंचावन्न वर्षांनंतरही पंडित नेहरूंवरच्या उर्दू कविता, नज्म आणि फिल्मी गीतं कालबाह्य आणि शिळी झाली नाहीत, उलट त्यांची सत्यता आणि मौलिकता आजच्या विखारी-खंडित कालखंडात अधिक प्रासंगिक आणि औचित्यपूर्ण वाटते!

कैफी आझमींनी ‘नेहरू’ या शीर्षकाची कविता त्यांच्या निधनानंतर दोनच दिवसांत लिहिली, त्यात त्यांनी नेहरूंचं विवेकीपण एकाकी राहिलेलं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा सेक्युलॅरिझम अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केला आहे. कैफींचं नेहरूंविषयी मतभेद असूनही डोळस प्रेम होतं. काँग्रेस पक्षातला हा एकच नेता खऱ्या अर्थानं भारतात समाजवाद, विवेकनिष्ठा आणि सेक्युलॅरिझम रुजवू शकतो, हे त्याचं अनुभवसिद्ध मत होतं. सदर कवितेची ही प्रभावी सुरुवात पाहा-

मैने तनहा कभी उसको देखा नहीं

फिरभी जब उसको देखा तो तनहा मिला

जैसे सहरा में चश्मा कहीं

या समंदर में मीनरे-नूर

या कोई जिक्र औहाम में

जिक्र सदियों अकेली-अकेली रही

ज़ेहन सदियों अकेला-अकेला मिला

और अकेला-अकेला भटकता रहा

हर नये हर पुराने ज़माने में वो

या ओळींद्वारे नेहरूंचं आंतरिक व्यक्तिमत्त्व जितकं अचूक प्रगट होतं, तेवढीच त्यांच्याबद्दल वाटणारी दर्दभरी आत्मीयताही उजागर होते. नेहरूंची स्वप्नदर्शिता, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचं शोधक मनाचं कवितेत मिथकाचा वापर करून झालेलं स्नेहल चित्रण फारच क्वचित इतरांच्या लेखनात सापडेल. पुढे कैफी नेहरूंची  विचारधारा – धर्मनिरपेक्षता धार्मिक प्रतीके वापरून किती अचूकपणे करतात ते पाहा –

जिन तकाज़ों मे उसको दिया था जनम

उनकी आगोश में फिरसमाया न वो

खून मे वेद गूँजे हुए

और जर्बी पर फुरोंजाँ अज़ाँ

और सीने पर रक्साँ सलीब

बे-झिझक सब के काबू मे आता गया

और किसी के भी काबू में आया न वो

सेक्युलॅरिझमची ही नेहरूप्रणित सर्वश्रेष्ठ अशी काव्यमय व्याख्या आहे! कैफीची  ‘बांगला देश’ नामक दुसरी एक नज्म आहे. त्यातील पुढील ओळी व्यक्तित्वाचा आणि विचारांचा प्रभावी आविष्कार आहे, असे मी मानतो.

वाचा : ‘संपूर्ण क्रांती’ नव्हे संघाला मान्यता मिळवून देण्याचे कारस्थान

वाचा : बांगलादेश निर्मितीत इंदिरा गांधींची दुर्गादेवींची भूमिका

नेहरूंसारखे महामानव देशनायक नकाशामध्ये – कागदांच्या तुकड्यांत नसतात, तर ते दबलेल्या, पिचलेल्या गरिबांच्या स्वप्नात निवास करीत असतात, हे कैफी असं कथन करतात –

मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे

कोई दीवार नहीं हूं कि गिरा दोगे मुझे

कोई सरहद भी नहीं हूं कि मिटा दोगे मुझे

ये जो दुनिया का पुराना नक्शा

मेज़ पर तुमने बिछा रक्खा है

इस में कावाक (पोकळ)  लकिरों कें सिवा कुछ भी नहीं

तुम मुझे इसमें कहाँ ढूँढ़तो हो?

मैं इक अरमान हूँ दीवानों का

सख्त-जाँ ख्वाब हूँ कुचले हुए इन्सानों का

लूट जब हद में सिवा होती है

जुल्म जब हद से गुज़र जाता है

मैं अचानक किती कोने में नज़र आता हूँ

किसी सीने से उभर आता हूँ

दुसरा पुरोगामी क्रांतिकारी उर्दू शायर साहिर लुधियानवी यांची पण एक अर्थपूर्ण नज्म आहे – ‘जिस्म की मौत कोई मौत नही होती’. त्यात त्यांनी नेहरूंच्या मानवतावाद, सेक्युलॅरिझम आणि समतावादी समाज स्थापनेसाठी केलेल्या कामाची सार्थ तारी केलेली आहे, ती वाचकांच्या हृदयाचा वेध घेते-

वो जो हर दीन से मुन्किर था, हर इक धर्म से दूर

फिरभी हर दीन, हर इक धर्म का गम-ख्वार रहा

जिसने इन्सानों की तकसीम के सदमें झेले

फिरभी इन्साँ की उ़खुव्वत का परस्तार रहा

जिसकी नजरों में था इक आलमी-तहजिब का ख्वाब

जिसका हर सांस नए अहद का मेअमार रहा

नेहरूंच्या विचारांचा वारसा जपत आपण भारतवासियांनी वाटचाल केली पाहिजे, असं सांगत साहिर नेहरू निधनानं व्याकूळ झालेल्या देशवासियांना संदेश देताना म्हणतात,

जो तुम्हे जादए-मंझिल का पता देता है

अपनी पेशानी पे वो नक्शे-कदम ले के चलो

दामने-वक्त पे अब खून के छींटे न पडे

एक मर्कज की तरफ दैरो-हरम ले के चलो

हम मिटा डालेंगे सरमाया-ओ-मेहनत का तजाद

ये अकिदा, ये इरादा, ये कसम ले के चलो

वो जो हमराज रहा, हाजिरो-मुस्तकबिल का

उसके ख्वाबों की खुशी, रूह का गम लेके चलो!

वाचा : यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

वाचा : बादशाह खान होते अखंड भारतासाठी झटणारे योद्धे

सर्वच प्रगतिशील लेखकांप्रमाणे पंडित नेहरूंनी खरा समाजवाद भारतात साकार केला नाही, म्हणून साहिरचा पण मोहभंग झालेला होता; तरीही नेहरू हेच काँग्रेस पक्षामधील भारताच्या गरिबांचे, शेतकरी-कामगारांचे व सेक्युलॅरिझम आणि गंगाजमनी तहजीबचे एकमेव कट्टर पुरस्कर्ते आहेत, याचंही साहिरांना भान होतं, जाण होती, म्हणून नेहरूंचं निधन चटका लावून गेलं होतं!

ज्ञानपीठ विजेते अली सरदार जाफरी हे पण उर्दूचे प्रगतिशील लेखक चळवळीतील महत्त्वाचे शायर व प्रागतिक लेखक चळवळीच्या साहित्याची सैद्धान्तिक समीक्षा करणारे समीक्षक. ते स्वत: स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट पक्षावर बंदी असताना पक्षाच्या वतीने प्रगतिशील साहित्य संमेलन भिवंडीला आयोजित केलं होतं, म्हणून मुंबई प्रांतात मोरारजी देसाईंच्या काँग्रेस सरकारनं त्यांना तुरुंगात टाकलं होतं. (कैफीवर पण त्यासाठी वॉरंट निघालं होतं, पण ते भूमिगत झाले म्हणून त्याची जेल वाचली.)

त्या वेळी नेहरू देशाचे पंतप्रधान होते. तरीही त्यांच्यावरील जाफरी यांचं प्रेम हा अन्याय होऊनही कायम होतं. त्यांच्या निधनानंतर जाफरींनी ‘रहबर की मौत’ आणि ‘संदल-ओ-गुलाब की राख’ अशा दोन भावपूर्ण कविता लिहिल्या होत्या.

नेहरू नेहमी जोधपुरी कोटाच्या बटनहोलमध्ये गुलाब लावायचे व त्यांचा देह चंदनाच्या चितेवर भस्मसात झाला होता, विमानानं त्यांची राख देशभरात शेता-वनात विखुरण्यात आली होती. त्याचा निर्देश करणारी ‘संदल-ओ-गुलाब की राख’ ही कविता आहे.

रहबर की मौत’मध्ये जाफरी लिहितात,

वह वतन की आबरू, अहले वतन का इफ्तिकार

महफिल-ए-इन्सान मे इन्सानियत का ताजदार

जाफरींच्या मते नेहरूंचा देह नष्ट झाला, पण त्यांचे विचार व कल्पना देशासाठी निरंतर मार्गदर्शक आहेत, म्हणून पुढे त्यांनी सदर कवितेत लिहिलं आहे-

अब हमारी आँख मे है उस की बंद आँखो का नूर

अब हमारे जिस्म मे है उस की रूह-इ-बेकरार

उसका परचम ले के मैदान मे निकलना है हमे

फर्श-इ-गुल से दूर अंगारो मे चलना है हमे

वाचा : स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग

वाचा : ‘बेगमात के आंसू’ : उद्ध्वस्त झालेल्या राजकन्यांच्या व्यथांचा दस्तऐवज

जाफरींनी नेहरूंचा समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव ‘संदल-ओ-गुलाब की राख’मध्ये कैफीप्रमाणेच अत्यंत भावूकतेनं तरीही सार्थपणे असा वर्णिला आहे.

सुना है जिसकी चिता से ये इक खाक आयी है

वो फस्ले गुल का पयंबर था अहद-ए-नौ का रसूल

वो बरहमन के जिसे मस्जिदों ने प्यार किया

वह बुत-शिकन के जो बज्म-ए-बुलन मे था मकबूल

वकार अंबवी हे फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेले शायर. त्यांनी नेहरूंचं १९६४मध्ये जे स्मरण केलं आहे, त्यावरून पाकिस्तानच्या सामान्य मुस्लीमांच्या मनातली भावना प्रकट झाली आहे.

कुछ दूर तो हम भी साथ चले उसे बाँके तिखें हिरो के

लेकिन जब हम साथ बिछडे तब भी वो इक रहबर था

स्वराज से बरसो पहले हर दिल पर उसका राज रहा

स्वराज भी उसके भाग से था

पाकिस्तानच्या मुस्लिमांना अखंड भारतात स्वातंत्र्यलढा चालू असताना, नेहरूंचा त्यातला सहभाग स्मरत होता, त्यांनाही तो आपला नेता वाटत होता व भारताचं स्वराज्य नेहरूंमुळेच आलं होतं, असं वाटायचं. पाकिस्तानी मुस्लिमांच्या प्रातिनिधिक भावनांना या कवितेद्वारे वकार अंबवींनी उजागर केलं आहे.

रशिद सिद्दीकींनी लिहिलं आहे-

बादे इश्क से जब बाद-ए-सबा आयेगी

दिल-ए-नेहरू के धडकने की सदा आयेगी

राफत सरोश शायराच्या या ‘जवाहर ज्योती’ नज्ममधल्या दोन ओळी पाहा-

शोला-ए-अम्न-ओ-मुहब्बत है जवाहर ज्योती

इस की लौ है के तबस्सुम है लब-ए-नेहरू का

१९५० ते ६०च्या दशकात नेहरू प्रणित भारत नामक संकल्पनेच्या विविध पैलूंचं दर्शन कधी कथेतून (उदाहरणार्थ- राज कपूरचे ‘बूटपॉलिश’, ‘जागते रहो’, ‘आवारा’ इत्यादी.) तर बहुसंख्य वेळा गीतातून प्रगट झाले आहेत. साहिरची ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना’, ‘वो सुबह कभी तो आयेगी’ किंवा ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ ही गीतं नेहरूंच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारी आहेत.

वाचा : भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी

वाचा : मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?

कैफी आझमीचं नेहरूंचं ‘मेरी आवाज सुनो’ हे गीत सर्वाधिक उल्लेखनीय आहे. त्यात नेहरूंचं निर्वाणानंतरच देशवासियांप्रतीचं स्वगत आहे.

मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो

क्यूं सजाई है ये चंदन की चिता मेरे लिए

मैं कोई जिस्म नही हूं के जला दोगे मुझे

राख के साथ बिखर जाऊंगा मैं दुनिया में

तुम जहाँ खाओगे ठोकर वही पाओगे मुझे

भारतातल्या गरिबांना जेव्हा व जिथे ठोकर बसेल, तिथं तिथं नेहरू असतील ही कैफीची कविकल्पना नेहरूंची गरिबांबद्दलची संवेदना व समताधिष्ठित समाजरचनेची आस्था सार्थपणे प्रकट करणारी आहे.

पण नेहरू युगाचं व त्यांच्या आधुनिक पुरोगामी, विज्ञाननिष्ठ व भविष्यवेधी विचार व कामाचं समग्र आणि प्रभावी वर्णन जर कुणी एकाच गीतातून केल असेल तर ते प्रेमधवन यांनी. ते उद्धृत करीत या सर्व उर्दू शायर व गीतकारांचे शब्द उसने घेत नेहरूंचे पुण्यस्मरण करत लेखाचा शेवट करतो –

छोडो कल की बाते, कल की बात पुरानी

नये दौर मे लिखेंगे मिलकर नयी कहानी

हम हिंदोस्ताँनी ।

आज पुरानी जंजिरों को तोड चुके है

क्या देखे उस मंझिल को जो छोड चुके है

चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना

नये जगत से हम भी नाता जोड चुके है

नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी

हम हिंदोस्ताँनी ।।

जाता जाता :